मुंबईः अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज अँगलनं अवघ्या बॉलिवूडलाच हादरा बसला. बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या अटकेनंतर आता एनसीबीच्या रडारवर अर्जून रामपाल आहे. यासर्व प्रकरणावर ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल परब यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स अँगल समोर आला आहे. बॉलिवूडमधील अनेक मोठी नाव या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय एनसीबीकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, या सर्व प्रकरणावरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठी फिल्म सिटी उत्तर प्रदेशात साकारणार असल्याचं म्हटलं होतं. यावरूनच मंत्री अनिल परब यांनी यावर भाष्य केलं आहे.

वाचाः

‘कोणत्या व्यक्तीकडे अंमली पदार्थ असतील किंवा कोण त्याचं सेवन करत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. पण याचा अर्थ संपूर्ण बॉलिवूड क्षेत्रच चुकीचं आहे असा होत नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणारच,’ असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर, ‘कोणी बॉलिवूडला बदनाम करत असतील किंवा बॉलिवूडला मुंबईबाहेर नेण्याचा प्रयत्न करत असतील. तर आम्ही असं होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

वाचाः दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडला ग्रहण लागल्यासारखीच स्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर तपासातून ड्रग्ज कनेक्शन पुढे आलं. त्यात सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची तपासात एंट्री झाली. त्यातून प्रकरणाची व्याप्ती वाढत गेली आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनाही चौकशीला सामोरं जावं लागलं. या प्रकरणात रियाला जामीन मिळाला असला तरी बॉलीवूडवरील ड्रग्जचं धुकं अद्याप दूर झालेलं नाही.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here