मुंबईः यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. या वादात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही एन्ट्री घेत अर्णब यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटण्याची परवानगी द्यावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यावर, गृहमंत्री यांनीही राज्यपालांना या मागचं कारण स्पष्ट केलं आहे.

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारण ही रंगले होते. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातही संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. अर्णब यांची अटक ही कायद्याला धरुन असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येतंय तर, भाजपनं मात्र ही अटक सुडबुद्धीने करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर राज्यपालांनीही अर्णब यांच्या आरोग्याविषयी व सुरक्षेविषयी गृहमंत्र्यांना फोन करुन चिंता व्यक्त केली होती. राज्यापालांच्या फोननंतर अनिल देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करत या सर्वांची उत्तरं दिली आहेत.

‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अर्णब यांच्या कुटुंबीयांनी जेलमध्ये जाऊन भेटण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी फोन केला होता. पण करोनाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून सर्व जेलमध्ये कैद्याच्या नातेवाईकांनी भेटण्यास मनाई आहे. संसर्गाचा धोका असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणूनच अर्णब यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये जाऊन भेटता येणार नाही. पण ते फोनवर त्यांच्याशी बोलू शकतात,’ असं स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिलं आहे.

वाचा:

तसंच, ‘तुरुंगात फोन वापरण्याची परवानगी आहे. पण त्यासाठी आधी जेल प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागते. अर्णब यांचे नातेवाईक किंवा वकिल प्रत्यक्ष भेटू शकणार नसले तरी त्यांना फोनवर अर्णब यांच्याशी बोलता येणार आहे. अर्णब गोस्वामी यांची योग्य काळजी घेण्यात येत आहे. याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here