वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अर्णब यांच्या अटकेनंतर अन्वय यांच्या पत्नी अक्षता नाईक व मुलगी आज्ञा नाईक यांनी महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले होतो तसंच, महाराष्ट्रातील जनतेलाही पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध असल्याच्या चर्चा होत होत्या. या सगळ्या प्रकरणावर शरद पवार यांनी आज पहिल्यांदा भाष्य केलं आहे.
‘नाईक कुटुंब मला भेटल्याचे जे फोटो व्हायरल होत आहेत ते पाच वर्षांपूर्वीचे आहेत,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच, राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केलेल्या फोनसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं आहे. ‘राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली हे चांगले आहे. पण मला वाटतं की, ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times