मुंबई: ‘बिहारची सूत्रे कुणाच्या हातात जायची ते जातील, पण बिहारच्या निवडणुकीने देशाच्या राजकारणाला तेजस्वी नावाचा मोहरा दिला आहे. पंतप्रधान मोदी या बलदंड नेत्यासमोर व बिहारमधील सत्ताधाऱ्यांच्या झुंडशाहीसमोर तो थांबला नाही व अडखळला नाही. याची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात राहील,’ अशा शब्दांत शिवसेनेनं यांच्या लढ्याचं कौतुक केलं आहे. (Shiv Sena praises )

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप व संयुक्त जनता दलाच्या आघाडीने बहुमत मिळवलं आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला सत्ता मिळवण्यात अपयश आले असले तरी त्यांनी एनडीएला कडवी लढत दिली. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असलेले यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. या सगळ्या निकालाचं कवित्व आता सुरू झालं आहे. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून बिहारच्या निकालावर भाष्य केलं आहे. शिवसेनेनं तेजस्वी यादव यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

वाचा:

‘बिहारच्या राजकारणात नव्या तेजस्वी पर्वाची सुरुवात झाली. तेजस्वी यादव हा नवा तरुण दमाचा चेहरा उदयास आला. त्याने पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार, अमित शहा, नड्डा व संपूर्ण सत्तामंडळाशी एकहाती लढत दिली. तेजस्वी यादवने राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमोर दमदार आव्हान उभे केले. लालू यादव तुरुंगात असल्यानं तेजस्वी यादव हाच महागठबंधनचा मुख्य चेहरा होता. तेजस्वीच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला व सभेत कमालीचा जिवंतपणा होता. नितीशकुमारांना शेवटची निवडणूक असल्याच्या विनवण्या कराव्या लागल्या. पंधरा वर्षे बिहारवर एकछत्री राज्य करणाऱ्या नितीशकुमारांवर ही वेळ तेजस्वी यादव यांनी आणली. कारण या तरुण मुलाने निवडणूक प्रचारात विकास, रोजगार, आरोग्य, शिक्षण हे मुद्दे आणले जे आधी साफ हरवले होते. बिहारची निवडणूक रंगतदार झाली. त्यात रंग भरण्याचे काम तेजस्वी यादवने केले. बिहार निवडणुकीत मोदी यांचा करिश्मा कामास आला असे ज्यांना वाटते ते तेजस्वी यादववर अन्याय करीत आहेत,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा:

‘तेजस्वी यांनी एक महागठबंधन बनवले. त्यात काँग्रेससह डावे वगैरे पक्ष आले, पण काँग्रेस पक्षाची घसरगुंडी मोठ्या प्रमाणात झाल्याचा फटका तेजस्वी यादवांना बसला. डाव्या पक्षांनी कमी जागा लढवून चांगली कामगिरी पार पाडली. मात्र तसे काँग्रेसला जमले नाही,’ असं निरीक्षणही शिवसेनेनं नोंदवलं आहे.

तेजस्वी हरले हे मानायला आम्ही तयार नाही!

‘बिहारमधील निकाल हा लोकशाहीचा कौल आहे व तो मानावाच लागेल. तेजस्वी यादव पराभूत झाले असे मानायला आम्ही तयार नाही. निवडणूक हरणे हाच फक्त पराभव नसतो आणि जुगाड करून आकडा वाढवणे हा विजय नसतो,’ असा टोला शिवसेनेनं भाजपला हाणला आहे. ‘तेजस्वीची लढाई म्हणजे मोठा संघर्ष होता. हा संघर्ष कुटुंबातला होता तसा समोरच्या बलाढय़ सत्ताधाऱ्यांशी होता. तेजस्वीची कोंडी करण्याची व बदनामी करण्याची एकही संधी दिल्ली व पाटण्याच्या सत्ताधाऱ्यांनी सोडली नाही. ‘जंगलराजचे युवराज’ अशी निर्भत्सना पंतप्रधानांनी करूनही तेजस्वीने संयम ढळू दिला नाही व लोकांत जाऊन ते प्रचार करीत राहिले,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here