मुंबई: रिपब्लिक टी.व्हीचे मुख्य संपादक यांच्या अटकेनंतर राज्यात राजकारण रंगले आहे. अर्णब यांच्या सुटकेसाठी भाजप नेते आक्रमक झाले असतानाच भाजप नेते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

‘रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या कोर्लई किल्ला येथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन खरेदी करण्यात आली आहे, असा गौप्यस्फोट सोमय्यांनी केला आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपून ठेवला? असे अजून किती व्यवहार झाले आहेत?,’ असा सवालही त्यांनी केला आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि मनिषा रविंद्र वायकर यांनी अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांच्याकडून रेवदंडा जवळच्या कोर्लई किल्ला परिसरात जमीन घेतली आहे. २१ मार्च २०१४ रोजी ठाकरे परिवाराकडून नाईक कुटुंबियांना २ कोटी २० लाख रुपये देण्यात आले. असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. त्याचबरोबर, या व्यवहारातील सातबारा संयुक्त आहे. नाईक परिवाराचं आपण समजू शकतो, पण ठाकरे आणि वायकर हे दोघांनी मिळून हा व्यवहार का केला?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर, ‘या जमीन प्रकरणाची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही किरीट सोमय्यांनी केली आहे. अर्णब गोस्वामी प्रकरणात एवढी तत्परता दाखवण्यामागे कारण समोर यायला हवं,’ असंही ते म्हणाले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here