मुंबई- बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारणारे अभिनेते यांनी आज दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील धर्मशाला येथील एका खासगी गेस्ट हाऊसमध्ये आत्महत्या केली. कांग्राचे एसपी विमुक्त रंजन यांनी या प्रकरणाची पुष्टी दिली आहे. असिफ बसरा यांच्या मृत्यूची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली.

आसिफ बसरा यांच्या आकस्मिक निधनाने बॉलिवूड सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे. हंसल मेहता, मनोज बाजपेयी, इमरान हाश्मी, दिव्या दत्ता, स्वरा भास्कर यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांनी सोशल मीडियावर आसिफ यांच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं.

प्राथमिक तपासात आसिफ नैराश्यग्रस्त असल्याचं म्हटलं जात आहे. आसिफ बसरा यांनी ‘परजानियां’, ‘ब्लैक फ्राईडे’, ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’, ‘क्रिश ३’, ‘एक विलन’, ‘मंजुनाथ’, ‘जब वी मेट’ या सिनेमात काम केलं आहे. याशिवाय त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here