मुंबई: ‘अर्णव गोस्वामी यांच्या रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी हे भाजपसाठी काम करतात म्हणूनच सरकारनं अन्वय नाईक यांचं आत्महत्या प्रकरण दाबलं,’ असा घणाघाती आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांनी केला आहे.

व या प्रकरणात ‘रिपब्लिक टीव्ही’चे मालक, संपादक अर्णव गोस्वामी यांना झालेल्या अटकेनंतर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी व भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक व ठाकरे कुटुंबांमध्ये जमीन व्यवहार झाल्याची माहिती पुढं आणली आहे. मात्र, नाईक कुटुंबीयांनी हे सगळे व्यवहार खुले असल्याचं म्हटलं आहे. अर्णव गोस्वामी यांना पाठिशी घालण्यासाठी सोमय्या हे आरोप करत आहे,’ असं आज्ञा नाईक यांनी म्हटलं आहे. त्यानंतरही सोमय्या या व्यवहारावरून ठाकरे सरकारला लक्ष्य करत आहेत.

वाचा:

सचिन सावंत यांनी सोमय्यांच्या या आरोपांचा समाचार घेतला आहे. ‘अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा व जमीन व्यवहाराचा संबंध काय? मराठी कुटुंबाची वाताहत झाली त्याचे सोमय्या यांना काहीही पडले नाही. नाईक यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात किरीट सोमय्या यांनी त्यांच्या जमीन व्यवहाराला मध्ये आणून आपली व भाजपाची हीन मानसिकता दर्शवली,’ अशी टीका सावंत यांनी केली आहे.

भाजप आणि अर्णव गोस्वामी यांच्या संबंधांबाबतही सावंत यांनी गौप्यस्फोट केला आहे. ‘रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी यांचा भाजपशी थेट संबंध आहे. फडणवीस सरकारने आत्महत्या प्रकरण दाबले कारण आरोपी भाजपशी संबंधित आहे. भाजपसाठी काम करतो. भाजप हा पक्ष महाराष्ट्र द्वेष्टा आहे हे स्पष्ट आहे,’ असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here