नवी दिल्ली : बिहारमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सत्ताउभारणी झाली. सायंकाळी ४.३० वाजता राजभवनात शपथग्रहण सोहळा पार पडला. राज्यपाल फागू चौहान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाची तसंच गोपनीयतेची शपथ दिली. यासोबतच नितीश कुमार सलग सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी आरुढ झाले आहेत. नितीश कुमार यांना यावेळी भाजपच्या आणि या दोघांची उपमुख्यमंत्री म्हणून साथ मिळणार आहे. ()

बिहारच्या पहिल्या

तारकिशोर प्रसाद हे कटिहार विधानसभा मतदार संघातून तर रेणू देवी या बेतिया मतदारसंघातून निवडून आल्यात. तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी या दोघांनीही आज मंत्रीपदाची तसंच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कटिहारमधून चौथ्यांदा निवडून येत तारकिशोर प्रसाद यांची भाजपचे विधिमंडळ गटनेता म्हणून निवड करण्यात आली तर बेतियाहून चौथ्यांदा निवडून आलेल्या रेणु देवी यांना उपगटनेता म्हणून निवडण्यात आलंय.

वाचा : वाचा :

रेणू देवी अतिमागास वर्गाशी निगडीत

यासोबतच, भाजप नेत्या रेणू देवी यांनी बिहारच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनून इतिहास रचला आहे. रेणू देवी या अतिमागासवर्गीस समजल्या जाणाऱ्या नोनिया समाजाशी निगडीत आहेत.

२००० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत रेणू देवी यांना पहिल्यांदा विजय मिळाला होता. त्यानंतर त्या २००५ आणि २०१० सालीही आमदार म्हणून निवडून आल्या. २०१५ साली मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

भाजप आणि आरएसएसचा प्रभाव

६२ वर्षीय रेणू देवी यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. १९७७ साली मुजफ्फरपूर विवितून इंटर पास झालेल्या रेणू देवी या १९८८ पासून राजकारणात आणि सामाजिक कार्यात सहभागी झाल्या होत्या. उल्लेखनीय म्हणजे, लहानपणापासून रेणू देवी या संघ परिवाराशी निगडीत आहेत. त्यांच्या आजोळी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा () मोठा प्रभाव दिसून येतो. रेणू देवी यांनी भाजपचं उपाध्यक्षपदही हाताळलेलं आहे.

रेणू देवी यांचे पती दुर्गा प्रसाद यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

वाचा : वाचा :

महत्त्वाच्या पदांची जबाबदारी यशस्वीरित्या हाताळली

रेणू देवी यांनी पक्षात महिला मोर्चाच्या अध्यक्ष, तीन राज्यांत महिला मोर्चा प्रभारी, राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य तसंच अमित शहा यांच्यया राष्ट्रीय अध्यक्ष समितीत राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलंय.

भाजपकडून अनेक महिला मोर्चांच्या आघाडीची जबाबदारी रेणू देवी यांनी योग्य पद्धतीनं हाताळलीय. २००५ साली नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये त्यांनी खेळ, कला आणि सांस्कृतिक मंत्रीपदाची जबाबदारी हाताळलेली आहे.

राज्यपाल फागू चौहान यांचं बिहारमध्ये आगमन झाल्यानंतर रेणू देवी यांनी एक जातिनिहाय संमेलनही भरवलं होतं. या संमेलनाच्या माध्यमातून भाजपनं अतिमागास वर्गीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वी याच मागासवर्गाचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी त्यांना ‘सायलेन्ट वोटर’ असं संबोधलं होतं.

महिलेला संधी

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर बिहारमध्येही एनडीएचे मुख्य घटक असलेल्या भाजप आणि जेडीयूनं सत्तेच्या सर्वोच्च पदांची विभागणी केलीय. जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीश कुमार एनडीए सरकारमध्ये मुख्यमंत्री बनले आहेत. तर भाजपकडून दोन जणांना उपमुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली आहे. यातील एक पद महिलेला तर एक पद पुरुषाला देण्यात आलं आहे.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here