पाटणा: नीतीश कुमार (Nitish Kumar) हे केवळ नामधारी मुख्यमंत्री असतील अशी टीका माजी केंद्रीय मंत्री यशवंच सिन्हा (Yashwant Sinha) यांनी केली आहे. भारतीय जनता पक्ष आपले मित्र निर्जीव होई पर्यंत त्यांना पिळून घेतो, असे सिन्हा म्हणाले. आपण मुख्यमंत्री बनणार नाही, असे यांनी एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते निवडल्यानंत म्हणाले. मात्र मित्रपक्षांच्या आग्रहानंतर ते तयार झाले. भाजपला सर्वाधिक जागा आल्याने त्या पक्षाच्या एखाद्या नेत्याने मुख्यमंत्री बनावे, असे आपल्याला वाटत असल्याचे नीतीश कुमार यांचे म्हणणे होते. ( says will be but only in name)

बिहारमध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज सोमवारी साडेचार वाजता राजभवन येथे पार पडला. रविवारी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेत जेडीयू अध्यक्ष नीतीश कुमार यांनी सरकार बनवण्याचा दावा केला. या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थ-१ अणे मार्गावर एनडीएची संयुक्त बैठक झाली. त्यात नीतीश कुमार यांची सर्वसहमतीने एनडीएच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे पर्यवेक्षक आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नीतीश कुमार यांच्या नावाची घोषणा केली.

राष्ट्रीय जनता दलाने टाकला शपथिधी सोहळ्यावर बहिष्कार
राजभवन येथे आयोजित समारोहावर राष्ट्रीय जनता दलाने आधीच घोषित केल्याप्रमाणे बहिष्कार टाकला. याबाबत राजदने आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले. ‘राष्ट्रीय जनता दल शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे. बदलाचा जनादेश हा एनडीएच्या विरोधात आहे. जनादेश ‘शासनादेशा’त बदलण्यात आला. बिहारचे बेरोजगार, शेतकरी, कंत्राटी कामगार, नियोजित शिक्षकांना विचारा त्यांची काय परिस्थिती झाली. एनडीएच्या धूर्तपणामुळे जनता त्रस्त आहे. आम्ही जनप्रतिनिधी आहोत आणि जनतेच्या सोबत उभे आहोत.’ असे राजदने ट्विटमध्ये लिहिले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी शपथ ग्रहण समारंभात सहभागी होण्यासाठी निमंत्रण धाडण्यात आले होते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here