आज संध्याकाळी ६ पासून लागू झाले असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. मागील तीन वर्षे लक्ष्मी विलास बँकेला तोटा झाला आहे. बँकेच्या बुडीत कर्ज मोठी वाढ झाली आहे. बॅंकेची व्यावसायिक रणनीती सपशेल अपयशी ठरल्याने रिझर्व्ह बँकेला आज कारवाई करावी लागली आहे. येत्या १६ डिसेंबरपर्यंत खातेदारांना केवळ २५ हजार रुपये काढता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केलं असून त्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
बुडीत कर्जे आणि सुशासनाचा अभाव यामुळे एका मागोमाग एक बँका आर्थिक संकटात सापडत आहे. याआधी पंजाब महाराष्ट्र बँक आणि येस बँक यांच्यातील अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेला निर्बंध घालावे लागले होते. यात अजूनही पंजाब महाराष्ट्र को ऑप बँकेवरील निर्बंध कायम असून ग्राहकांचे मात्र मोठे हाल झाले आहेत.
आज लक्ष्मी विलास बँकेवर पुढील महिनाभरासाठी मोरॅटोरियम लागू करण्यात आले असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. याबाबत आज अध्यादेश काढण्यात आला आहे. लक्ष्मी विलास बँकेमधून गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यात आले असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. त्याशिवाय बँकेला पुरेशा प्रमाणात भांडवल उभारण्यात अपयश आले. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. आता रिझर्व्ह बँकेने प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शनअंतर्गत लक्ष्मी विलास बँकेवर कारवाई केली आहे.
खातेदारांनी घाबरु नकाखातेदारांच्या हिताच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेकडून लक्ष्मी विलास बँकेच्या सक्षमीकरणाचा विचार केला जात आहे. आजच्या कारवाईने खातेदारांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केलं आहे. ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत. ठेवींना विमा संरक्षण आहे, असे आरबीआयने स्पष्ट केलं आहे. बँकेच्या दुसऱ्या बँकेत विलीन करण्याबाबत रिझर्व्ह बँकेने योजना तयार केला असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times