भारतीय जनता पक्षाचे लोक धोका देणारे असल्याचे अय्यर म्हणाले. हे लोक जनतेचे प्रतिनिधी नाहीत. जर ते लोकांचे प्रतिनिधी असते तर लोकांनी त्यांना यापूर्वीच निवडून दिले असते असेही अय्यर म्हणाले. सभेला संबोधित करताना त्यांनी काश्मीरचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले की, सरकार काश्मीर खोऱ्यात आपले ३६ मंत्री पाठवत आहे. हे मंत्री इतके डरपोक आहेत, की त्यांपैकी ३१ मंत्री जम्मूमध्ये जात आहेत, तर फक्त ५ मंत्री काश्मीरला जात आहेत.
या केंद्रशासित प्रदेशाचा केंद्राच्या संपर्क कार्यक्रमाअंतर्गत ३६ केंद्रीय मंत्री जम्मू आणि काश्मीरचा दौरा करत आहेत. यांपैकी फक्त ५ मंत्री ४ दिवसांमध्ये काश्मीरचा दौरा करणार आहेत. उर्वरित मंत्री जम्मू भागाचा दौरा करणार आहेत. दौऱ्यावर असलेले मंत्री लोकांशी संवाद साधणार आहेत. तसेच या दौऱ्यादरम्यान ते विकासाच्या मुद्दायावर लोकांशी बोलणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times