शिवसेना नेते अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. ‘मुंबईवर शिवसेनेचाच भगवा आजपर्यंत फडकत आला आहे. यापुढेही शिवसेनेचाच भगवा फडकत राहीलं, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. शिवाय, आत्तापर्यंत अनेकांनी मुंबई महापालिकेवर सत्ता आणण्याच्या घोषणा केल्या त्या केवळ घोषणाच राहिल्या,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
‘मुंबईची सत्ता भाजपला द्यायला मुंबईची जनता मूर्ख नाही त्यांना बरोबर माहितीये कोणाला साथ द्यायची. मुंबईकर नेहमीच शिवसेनेसोबत राहतात यापुढेही ते शिवसेनेसोबतच राहतील कारण त्यांना माहित आहे शिवसेना हीच आपल्या संकटाच्या काळात धावून येते,’ असंही ते म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते देवेंद्र फणडवीस?
डोक्यात सत्ता गेली की पतन अटळ असते आणि मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारी सत्ता बदलण्याची वेळ आता आली आहे, असे नमूद करतानाच जनतेचा विचार करणारे लोक पालिकेच्या सत्तेत आणावे लागतील आणि हाच मुंबईचा संकल्प असला पाहिजे, असं, आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times