वाचा:
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील डाळिंब बागांचे नुकसान झाले. सांगली जिल्ह्यातील आटपाडी, खानापूर, विटा, जत यासह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा परिसरातील बागांना याचा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांचे हातचे पीक वाया गेले, परिणामी डाळिंबाची आवक घटली आहे. बाजार समितीच्या सौदे बाजारात यापूर्वी सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून रोज सरासरी ८०० ते १००० टन डाळिंबाची आवक सुरू होती. गेल्या महिन्यापासून यात कमालीची घट झाली. सध्या केेवळ १५० ते २०० टन डाळिंबाची आवक होते. आवक नसल्याने सांगोला, पंढरपूर, अकलूज, इंदापूर येथील डाळिंब सौदे बंद आहेत. मागणीप्रमाणे डाळिंबांची उपलब्धता नसल्याने दरात मोठी वाढ झाली आहे.
वाचा:
आटपाडी बाजार समितीमध्ये गुरुवारी बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ नागणे यांच्या मंगलमूर्ती फ्रूट सप्लायर्सच्या अडत केंद्रावर चोपडी येथील पाडुरंग गायकवाड डाळिंब विक्रीसाठी आले होते. सौद्यांमध्ये त्यांच्या डाळिंबांची तब्बल ६२५ रूपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. तर त्यांच्याच अन्य डाळिंबाला ६०० रुपयांचा दर मिळाला. सांगोला तालुक्यातील अनकटाळ येथील नामदेव बंडगर यांच्या डाळिंबाला ४२५ रुपये एवढा दर मिळाला. नाझरा येथील सिद्धनाथ सरगर यांच्या डाळिंबाला ४०० रुपये, बलवडी येथील मन्सूर शेख यांच्या डाळिंबाला १२५ रुपये, फडतरी येथील सुरेश तबारे यांच्या डाळिंबाला १५१ रुपये दर मिळाला. डाळिंबाला विक्रमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, डाळिंबाची आवक कमी असली तरीही विक्रमी दरामुळे सौदे बाजारात उलाढाल वाढत आहे, अशी माहिती बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ नागणे यांनी दिली.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times