अहमदनगर: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करण्याची मागणी काही जण करीत आहेत. मात्र मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यास अनेक संघटनांनी विरोध केला आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर ओबीसींच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी सर्व संघटनांनी संघटीतपणे एकमुखी लढा उभारण्याची निर्धार करण्यात आला असून त्यासाठी नगरमध्ये २३ नोव्हेंबरला ओबीसी हक्क परिषदेच्या वतीने महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

वाचा:

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. त्यातच मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची ही मागणी अनेकदा पुढे येत असते. मात्र त्याला ओबीसी समाजातील अनेक संघटनांचा विरोध आहे. त्यासाठी लढा उभारण्याची तयारीही या संघटनांनी सुरू केली असून त्याच अनुषंगाने नगरमध्ये महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी निवडक कार्यकर्त्यांची बैठक नगरमध्ये झाली. या बैठकीला समता परिषद, जय भगवान महासंघ, नाभिक महामंडळ, तेली समाज संघटना, धनगर महासंघ, मल्हार सेना, ओबीसी परिषद, सावता परिषद, कुंभार समाज, सोनार समाज, गुरव समाज, चांभार समाज, फुले ब्रिगेड, सावता युवक आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे आता या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार, याकडे ओबीसी समाजासह इतर समाजाचेही लक्ष लागले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here