नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील नगरोटा येथे झालेल्या चकमकीत (Nagrota Encounter) सुरक्षादलांनी पाकिस्तानमधील () या दहशवादी संघटनेच्या ४ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. (PM Narendra Modi) यांनी या प्रकरणात थेट पाकिस्तानचे नाव घेतले आहे. पंतप्रधान मोदी यांनी काही ट्विट केली आहेत. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी ज्या इराद्याने भारतात आले होते, ते पाहता आमच्या सतर्क सुरक्षादलांनी त्यांच्या इराद्यावर पाणी फेरले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ( targets pakistan on terrorism in the context of jammu kashmir )

पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित ४ दहशतवाद्यांकडून मोठ्या संख्यने शस्त्रास्रे आणि स्फोटके हस्तगत करण्यात आली. हे पाहता हे दहशतवादी आमच्या देशात दहशतवाद पसरण्यासाठी आहे होते हे स्पष्ट होत आहे आणि त्याच्या इराद्यावर पाणी फेरले गेले आहे.

मोदी पुढे म्हणाले की, आमच्या सुरक्षादलांनी पुन्हा एकदा शौर्य आणि त्यांच्या सतर्कतेमुळे दहशवाद्यांचा कट उधळून लावला आहे. सुरक्षादलांनी जम्मू आणि काश्मीरमधील लोकशाही प्रणालीला लक्ष्य करणारा एक अपवित्र कटाचा पराभव केला आहे.

मोठ्या हल्ल्याचा होता कट
या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव आणि गुप्तचर यंत्रणेतील प्रमुक अधिकारी यांची नगरोटा चकमकीबाबत महत्वाची बैठक घेतली. याबाबत सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ४ दहशतवादी २६/११ च्या हल्ल्याच्या दिवशी २६ नोव्हेंबरलाच पुन्हा मोठा दहशतवादी हल्ला करण्यात तयारीत होते. सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांना गुरुवारी पहाटे ४ वाजता चकमकीत ठार करत त्यांच्या योजनेला सुरुंग लावला.

क्लिक करा आणि वाचा-

पंतप्रधान मोदी यांनी घेतली बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, परराष्ट्र सचिव, आणि गुप्तचर यंत्रणेतील प्रमुख अधिकारी यांच्या सोबत महत्त्वाची बैठक घेतली. हे दहशतवादी २६/११ सारखाच दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here