पाटणा: बिहार विधानसभा निवडणूक () होऊन निकालही लागला. नीतीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वात राज्यात एनडीएचे () सरकारही स्थापन झाले. निवडणुकीत महाआघाडीत असलेल्या पक्षाची कामगिरी मात्र चांगली झाली नाही. काँग्रेसने राज्यात एकूण ७० जागा लढवल्या. जिंकल्या मात्र फक्त १९. काँग्रेसच्या बिहारमधील या वाईट कामगिरीवर दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी भाष्य केले आहे. काँग्रेसचे आता पतन होत असून काँग्रेसचा आता कोणी माय-बाप नाही, असे वाटते, असे केजरीवाल म्हणाले. ज्या प्रकारे काँग्रेस कामगिरी करत आहे ती पाहता असे वाटते की काँग्रेस हे देशाचे भविष्य नाही, असेही केजरीवाल पुढे म्हणाले.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे हिंदुस्तान टाइम्स लीडरशीप समिट २०२० मध्ये बोलत होते. काँग्रेस आता पूर्णपणे ढासळत चालला आहे. काँग्रेसचा कोणी माय-बाप शिल्लक राहिलेला नाही. प्रत्येक राज्यात आम्ही पाहतोय की लोक भाजपला कंटाळून काँग्रेसला मतदान करतात आणि त्यानंतर कांग्रेस मात्र भाजपचेच सरकार स्थापन करून देतो. काँग्रेसचे सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करतात. अशात निवडणुका तर निरर्थक झाल्या आहेत. तुम्ही मतदान काँग्रेसला करा किंवा भाजपला, सरकार तर भाजचेच स्थापन होते, असे केजरीवाल म्हणाले.

काँग्रेसला आता भविष्य नाही- केजरीवाल
केजरीवाल पुढे म्हणाले, ‘राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसला पर्याय म्हणून कोणीतरी असायला हवे. मग तो पक्ष प्रादेशिक पक्ष असो किंवा आणखी काही. मात्र काँग्रेसला आता कोणतेही भविष्य नाही.’

क्लिक करा आणि वाचा-

दिल्लीतील कामामुळे आपला संपूर्ण देशात ओळख मिळाली- केजरीवाल
आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणातील भूमिकेबाबत विचारले असता केजरीवाल यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. केजरीवाल यांनी स्मित करत फक्त इतकेच म्हटले, ‘याबाबत तर येणारा काळच सांगेल की आमची भूमिका काय असेल.’ आम आदमी पक्ष हा एक छोटा पक्ष आहे. मात्र दिल्लीत केलेल्या कामांमुळे संपूर्ण देशात लोक आपकडे आदराने पाहतात. देशातील लोक पर्याय नक्कीच देतील हा मला विश्वास आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले.

क्लिक करा आणि वाचा-
क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here