काँग्रेसवर हल्लाबोल
कपिल सिब्बल यांनी सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्राच्या मुद्द्यावर देखील आपली बाजू मांडली. सिब्बल म्हणाले की, ऑगस्ट २०२० मध्ये आम्ही लिहिलेले पत्र हे आमचे तिसरे पत्र होते. गुलामनबी आझाद यांनी दोन पत्र धाडलेली होती. मात्र, तरी देखील कोणीही आमच्याशी चर्चा केली नाही. म्हणूनच जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी बोललो, असे सिब्बल म्हणाले.
निवडणुकी जय-पराजय होतच असतात- सिब्बल
आम्ही २०१४ ची निवडणूक हारलो, काही झाले नाही. त्यानंतर आम्ही २०१९ मध्ये पराभूत झालो. त्यानंतर कोणता मोठा बदल झाला नाही. निवडणुका होत राहतात, मात्र काँग्रेसने कमीतकमी आपल्या भविष्याच्या मार्गावर तरी व्यवस्थित चालले पाहिजे, असे मला वाटत असल्याचे सिब्बल म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
नेतृत्वात बदलाबाबतचा प्रश्न विचारल्यानंतर सिब्बल म्हणाले की, आमचे प्रमुख नेता जेव्हा अध्यक्ष बनायचे नाही, असे बोलतो तेव्हा मग मी नेतृत्वबदलाबाबत का बालू?. आपल्याला अध्यक्ष बनायचे नाही, असे राहुल गांधी स्वत: म्हणाले आहेत, असे सिब्बल यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times