नगरला राहणाऱ्या एका महिलेचे लग्न मुळचा जम्मू-काश्मीर येथील असणाऱ्या व सध्या मुंबई येथे राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत झाले होते. ही महिला दुबई येथे नोकरीच्या निमित्ताने गेली होती. त्यानंतर ती दुबईवरून नुकतीच परत आली, व या महिलेने तिच्या पतीला काल, शुक्रवारी फोन केला. त्यावेळी तिचा पती फोनवर बोलताना म्हणाला, ‘तु इंडिया मे आ गयी क्या. इंडिया क्यू आइ. मेरा तेरे से और बेटी से कुछ रिश्ता नही. मुझे तेरे साथ संबंध नही रखने. मैने तुझे तलाक दे दिया आहे,’ असे म्हणून त्याने फोन ठेवून दिला.
वाचाः
फोनवर ‘तलाक हा शब्द वापरल्यामुळे संबंधीत महिलेने आपल्या पतीच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून तिच्या पतीवर मुस्लिम महिला विवाह अधिकाराचे संरक्षण अधिनियम २०१९ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचाः वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times