वाचा:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. करोनाच्या अनुषंगाने हे महत्त्वाचे संबोधन होते. यावेळी सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेने या संकटात जी साथ दिली आणि सहकार्य केले आहे, त्याला सलाम केला. करोना काळात सर्वच सण साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ईद, दिवाळी या सणांमध्ये सरकारने केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवले. नुकतेच छठपूजा पर्व पार पडले. यावेळीही उत्तर भारतीयांनी गर्दी टाळून सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्या सर्वांचेच कौतुक करताना तुम्ही दाखवलेल्या सहकार्याला तोड नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
वाचा:
आजपासून ४ दिवसांनी मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण होतील. शूरवीर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच कमांडोज यांनी त्या युद्धात प्राणपणाने दहशतवाद्यांशी सामना केला होता. आताही आपण नावाच्या छुप्या दहशतवाद्याशी कडवा मुकाबला करतो आहोत, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी वारकऱ्यांनाही हात जोडून विनंती केली. आपले सण, उत्सव थांबलेले नाहीत. चार दिवसांवर आली आहे. आषाढीला जसे आपण सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकी एकादशी बाबतही करावे, असे विनम्र आवाहन मी वारकरी बंधू-भगिनींना करतो आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मला राजकारण करायचे नाही. पण करोना वाढला तर हे उघडा ते उघडावाले या परिस्थितीची जबाबदारी घेणार का? असा हा माझा सवाल आहे. पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे उघडली आहेत. कोणती गोष्ट कधी सुरू करायची याचे भान आम्हाला आहे. शाळांबाबतही आम्ही निर्णय घेतला आहे. मात्र करोनाची भीती असल्याने अजून शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. आम्ही अत्यंत सावधपणे पुढे जात आहोत. त्यामुळे उगाच गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
वाचा:
यंदा दसऱ्याला शिवसेनेचा मेळावा देखील शिवतीर्थावर मोठेपणाने साजरा न करता साधेपणाने केला, मी आपला मुख्यमंत्री आहे त्यामुळे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि…’ असे असू नये म्हणून नियम माझ्यापासूनच काटेकोरपणे पाळले आहेत. दिवाळीत फटाके वाजवू नका, असे मी सांगितले आणि आपण माझे ऐकले आणि यंदा खूप कमी फटके उडाले. असेच सहकार्य पुढेही हवे आहे. प्रत्येक गोष्टींसाठी कायदे करण्याची गरज नाही, असे मला वाटते आणि म्हणूनच मी तुम्हाला वारंवार विनंती करतो आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले.
ज्येष्ठ नागरिक , सहव्याधीना सांभाळा
करोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्यांना आहे. आजपर्यंत आपण त्यांना सांभाळून होतो. आता करोनाचा संसर्ग तरुणांमध्येही वाढतोय आणि त्यांच्या माध्यमातून घराघरातल्या ज्येष्ठ मंडळीपर्यंत होतोय हे निश्चितच खूप धोकादायक आहे. आज आपल्या हातात लस नाही, कधी येईल ते सांगता येत नाही. आली तरी राज्यातल्या सर्व लोकांना अगदी दोन डोस द्यायचे म्हटले तरी २४ ते २५ कोटी जनतेला द्यावे लागतील. त्यामुळे केवळ मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा, हात धूत राहणे हीच त्रिसूत्री आहे. कोविडनंतर रुग्ण खडखडीत बरे सुद्धा होत आहेत पण पोस्ट कोविड दुष्परिणाम सुद्धा दिसताहेत, असे नमूद करत आपण कशासाठी विषाची परीक्षा बघायची, असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी केला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times