जयपूरः सोशल मीडियामुळे पती-पत्नीमध्ये भांडण होत असल्याचे प्रकार या आधी समोर आले आहेत. सोशल मीडियावर पत्नी तासन तास राहत असल्याने काही प्रकरणे घटस्फोटापर्यंत गेल्याचेही प्रकार उघडकीस आले आहे. परंतु, सोशल मीडियावर ६ हजार फॉलोअर्स असल्याने तसेच सोशल मीडियाचा अती वापर करीत असल्याने पत्नीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

रेश्मा मंगलानी (वय २२) असे हत्या करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तिचे फेसबुकवर ६ हजार फॉलोअर्स होते. तसेच ती सोशल मीडियाचा सतत वापर करीत असल्याने तिचा पती अयाज अहमद (वय २५) याने रागाच्या भरात तिची हत्या केली. रेश्माचे सोशल मीडियावर कोणासोबत तरी प्रेमसंबंध आहे, असा संशय अयाजला होता. अयाज हा डिलिव्हरी बॉयचे काम करतोय. तो कामाला गेल्यानंतर रेश्मा सोशल मीडियावर अॅक्टिव असायची. पत्नीचे कुणासोबत तरी अनैतिक संबंध किंवा प्रेमसंबंध असतील असा संशय बळावल्याने सोमवारी अयाजने जयपूर-दिल्ली हायवे मार्गावर नेऊन पत्नीची दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी आरोपी अयाजला अटक केली आहे.

रेश्मा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव होती. फेसबुकवर तिचे ६ हजार फॉलोअर्स होते. यावरून दोघा पती-पत्नीत भांडण व्हायचे. पत्नीचे प्रेमसंबंध असतील असा संशय मनात बळावल्याने दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. या सर्व प्रकाराला कंटाळून रेश्मा दोन महिन्यापूर्वी दोन वर्षाच्या मुलीला घेऊन माहेरी गेली होती. तसेच तिने घटस्फोट घेण्याची तयारी केली होती. दोन महिन्यानंतर सोमवारी अयाज तिला भेटायला आला. हायवेवर भेटायला बोलावल्यानंतर तिला बियर पाजली. त्यानंतर रात्री जयपूर-दिल्ली हायवेवर अज्ञात स्थळी नेऊन तिची दगडाने ठेचून हत्या केली. तिची स्कूटी जंगलात फेकून दिली व त्या ठिकाणाहून पळ काढला. दुसऱ्या दिवशी स्कूटीच्या नंबर प्लेटवरून पोलिसांनी आरोपीचा शोध लावला. अयाजची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here