राष्ट्रवादीचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या; तर मला चंपा म्हणतात. हे कसे चालते,’ असा आरोप पाटील यांनी केला होता. या आरोपांवर उत्तर देताना जयंत पाटील यांनी पक्षाकडून स्पष्टीकरण दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी काँग्रेसनं कधीही टरबुज्या म्हटलं नाही. द्रकांत पाटील यांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे. त्यामुळं त्यांनी राग मानू नये. अशाप्रकारे कोणाचाही अपमान करण्याला राष्ट्रवादी काँग्रेस कधीही समर्थन देत नाही, असं स्पष्टी केलं आहे. तसंच, शरद पवारांनी आम्हाला कधी अशा गोष्टी शिकवल्या नाहीत, असा टोलाही जयंत पाटलांनी भाजपला लगावला आहे.
‘पदवीधर मतदारसंघाच्या याद्या उशिरा जाहीर झाल्या. त्यामध्ये दुबार नावे, एकच मोबाईल क्रमांक, चुकीचे पत्ते, अशा अनेक त्रुटी आहेत. या मतदारांपर्यंत प्रचारयंत्रणा पोहोचू नये, म्हणून कोणीतरी असे केले आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती,’ जयंत पाटील यांनी केला आहे.
‘राज्य सरकारवर ६७ हजार कोटींची थकबाकी आहे. या अवस्थेत सरकार वीजेसंदर्भात दुरुस्तीची कामे करणार आहेत. आपणी व्यवस्था टिकणे महत्त्वाची आहे. आम्ही वीज बिलासंदर्भात मार्ग काढण्यासाठी संवेदनशील आहोत. पण मागील सरकारने काम केले असते तर ही वेळ आली नसती,’ असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times