राज्यात आज ३० बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून राज्यातील मृत्यूदर थोडासा कमी होऊन २.६१ % एवढा झाला आहे. आज ४ हजार १५३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून दिवसभरात ३ हजार ७२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे होणारे रुग्ण आणि नवीन बाधित यांचा आकडा गेल्या दोन दिवसांपासून उलटा झाल्याने काहीशी चिंतेत भर पडली आहे. आतापर्यंत एकूण १६ लाख ५४ हजार ७९३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण () ९२.७४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २ लाख ८१ हजार ५४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ८४ हजार ३६१ (१७.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख १७ हजार ७११ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ६ हजार ५२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र धोक्याच्या वळणावर आहे आणि या वळणावरून महाराष्ट्राला करोनामुक्तीकडे न्यायचे आहे की लॉकडाऊनच्या दिशेने न्यायचे आहे, याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच केले होते. विषाची परीक्षा घेऊ नका. वेळीच सावध व्हा, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले होते. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी करोनामृत्यूंत घट पाहायला मिळाल्याने धोक्याच्या वळणावर ही काहीशी दिलासा देणारी बातमी ठरली आहे.
– करोनाचे सध्या राज्यात ८१ हजार ९०२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. , पुणे, या मोठ्या शहरांत करोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. शहर आणि जिल्ह्यात करोनाचे १७ हजार ५४५ रुग्ण आहेत तर ठाणे जिल्ह्यात १५ हजार १५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. मुंबईत हीच संख्या १२ हजार ७०७ इतकी आहे.
– करोनाने आज ३० रुग्ण दगावले. हा गेल्या काही महिन्यांतील निचांक ठरला. या ३० पैकी १४ मृत्यू मुंबईतील आहेत तर ६ मृत्यू पुणे विभागात झाले आहेत. कोल्हापूर, औरंगाबाद, अकोला या विभागांत आज एकही करोना बाधित रुग्ण दगावला नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times