मुंबई: पंतप्रधान यांनी करोना संसर्गाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री यांनी करोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही एक ट्विट केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून करोनावर लस निर्मिती करणाऱ्या विविध कंपन्यांच्या संपर्कात आहेत. तसंच महाराष्ट्रात लसीकरण कशा रितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आम्ही करोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहेत, अशी माहिती दिली आहे.

वाचा:

दरम्यान, केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या सूचना कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न महाराष्ट्र करीत असून राज्यात दोन टप्प्यात राबविण्यात आलेल्या
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे व संसर्ग रोखण्यात यश मिळाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. या मोहिमेत प्रत्येक घरात आरोग्य चौकशी करण्यात आली असून ११ कोटी ९२ लाख लोकांचा आरोग्य डेटा आपल्याकडे आहे. यातून राज्याचा आरोग्य नकाशा तयार होण्यास मदत होणार आहे. या मोहिमेत ३.५ लाख सारी आणि आयएलआयचे रुग्णही सापडले तसेच ५१ हजार करोना रुग्ण आढळले ज्यांच्यावर उपचार करण्यात आले अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here