आपली मुलगी गायब झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला होता. पण या प्रकरणात तरुणी स्वत: न्यायालयात हजर झाली. आणि आपलं घर आणि आपलं कुटुंब स्वतःहून सोडलं आहे. आणि सध्या लग्न करुन एका व्यक्तीबरोबर राहत आहे, असं तरुणीने न्यायालयात सांगितलं. तिने कलम १६४ नुसार आपला जबाबही नोंदवला आहे.
स्वेच्छेने घर सोडलंः तरुणी
मुलीने स्वेच्छेने घर सोडलं आणि एका एका व्यक्तीशी लग्न करून त्याच्यासोबत राहते आहे हे न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढलं. कोणतीही प्रौढ महिला आपल्या मर्जीनुसार आणि कोणासोबतही राहण्यास स्वतंत्र आहे, असं म्हणत न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढलं. तरुणीचा जन्म २००० मध्ये झाला होता. म्हणजेच ती सुमारे २० वर्षांची आहे आणि ती प्रौढ आहे. अशा परिस्थितीत कुटुंब तिच्यावर कोणताही निर्णय घेण्यास दबाव आणू शकत नाही, असं न्यायालयाने सुनावणीत स्पष्ट केलं.
मुलीला फसवल्याचा आरोप
आपली मुलगी १२ सप्टेंबरपासून घरातून बेपत्ता आहे. तिला कुणीतरी आमिष दाखवून किंवा फसवून नेल्याचा संशय कुटुंबाने व्यक्त केला. यानंतर न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. मुलीच्या कुटुंबीयांनी ज्या मुलावर संशय घेतला त्याने तिच्याशी लग्न केलं. दोघांनी आपल्या मर्जीने लग्न केलं असून मुलीनेही याबाबत कबुलीजबाब दिला आहे, असं पोलीस तपासात समोर आलं.
सुरक्षा पुरवण्याची पोलिसांना सूचना
तपास करणाऱ्या पोलिसांनी न्यायालयात सर्व माहिती दिली. यानंतर न्यायालयात सुनावणी झाली. मुलीवर घरी परत येण्यासाठी कुटुंबीयांनी दबाव आणू नये. यासह पोलिसांनी मुलाच्या घरी दोघांना घेऊ जावं आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले.
मुलगा आणि मुलगी या दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांना धमकावणं किंवा त्रास देऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिलेत. पोलिसांनी बीट कॉन्स्टेबलचा मोबाइल क्रमांक जोडप्याला द्यावा. भविष्यात त्यांना कोणतीही मदत हवी असल्यास त्यांना सहकार्य करावं, असे निर्देश न्यायालयाने तपास अधिकाऱ्याला दिले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times