उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला या महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्तानं संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची ‘अभिनंदन’ मुलाखत घेतली आहे. राऊत यांनी मुलाखतीचे प्रोमो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘उद्या धमाका’ असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
वाचा:
शिवसेनेवर टीका करण्यासाठी संधीच्या शोधात असणाऱ्या नीलेश राणे यांनी या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे. ‘ज्या मुलाखतीतून आणि ज्या व्यक्तींकडून महाराष्ट्राला काही मिळत नाही अशा फुकट्या लोकांना बघायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही. चंगू मंगूच्या फालतू गप्पा,’ असं ट्वीट नीलेश राणे यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ‘सामना’ला दिलेली ही दुसरी मुलाखत आहे. त्यांच्या या आधीच्या मुलाखतीनंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते. ताज्या मुलाखतीतही त्यांनी मागील काही दिवसांतील घडामोडींवर भाष्य केल्याचं प्रोमोतून दिसत आहे. केंद्र सरकार ईडी व सीबीआयच्या माध्यमातून करत असलेली कारवाई असो, सरकार पाडण्याची भाकितं असो वा करोनाच्या निमित्तानं होणारं राजकारण असो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्धव यांनी दिली आहेत. त्यामुळं या मुलाखतीबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times