नवी दिल्ली: कृषी कायद्याविरोधात ()आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री (Amit Shah) यांनी आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांची प्रत्येक समस्या आणि आणि मागण्यांवर विचार करण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचे शहा म्हणाले. कृषीमंत्री () यांनी शेतकऱ्यांना ३ डिसेंबर या दिवशी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. (the government is ready to talk with farmers says home minister )

पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली-हरयाणा सीमेवर महामार्गांवर विविझ शेतकऱ्यांच्या संघटनांनी केलेल्या आवाहनावर आज जे शेतकरी बांधव आपले आंदोलन करत आहेत, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की भारत सरकार आपल्याशी चर्चा करण्यास तयार आहे, असे अमित शहा म्हणाले. जर शेतकरी ३ डिसेंबरच्या पूर्वी चर्चा करून इच्छित असतील, तरी देखील सरकार तयार असल्याचे शहा म्हणाले.

कृषी मागे घेण्यात यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली-हरयाणा सीमेवर त्यांचे आंदोलन सुरू आहे. आम्हाला जंतरमंतर येथे आंदोलन करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र सरकारने त्यांना जंतरमंतरवर आंदोलन करण्याची परवानगी न देता दिल्लीतील बुराडी येथील निरंकारी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांना ही जागा पसंत नाही. ते संधू सीमेवरच अडून राहिले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- अमित शहा यांनी ‘या’ अटीवर दिले आश्वासन
केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी लवकरात लवकर चर्चा करावी असे जर शेतकऱ्यांना वाटत असेल, किंवा ३ डिसेंबरच्या आधीच चर्चा करावी असे वाटत असेल, तर तुम्हीजर निर्धारित स्थानावर स्थलांतरीत होत असाल, तर जाण्याच्या दुसऱ्याच दिवशी सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करेल, हे माझे तुम्हाला आश्वासन आहे, असे अमित शहा म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here