वाचा:
राज्य सरकारला वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने भाजपकडून राज्यात ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेण्यात येत आहे. आज नगरमध्येही फरांदे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. याप्रसंगी माजी मंत्री प्रा.राम शिंदे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गांधी, उपमहापौर मालन ढोणे, भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, सुनील रामदासी, सचिन पारखी आदी उपस्थित होते.
‘आम्हाला सरकार पाडण्याची अजिबात घाई झाली नाही. हे एकमेकांच्या अंतर्गत स्पर्धेमुळे व यांच्यातील विसंवादामुळे पडेल. आम्ही याची वाट बघत नाही,’ असे सांगत फरांदे पुढे म्हणाल्या, ‘राज्यात अतिशय सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करीत आहोत. मंदिर उघडावे, वीज बिल दरवाढ कमी व्हावी, याबाबतीत आम्ही आंदोलन केले. महिलांवर अन्याय अत्याचार झाले, त्यावर आंदोलन केले. दूध दरवाढीसाठी आंदोलन केले. परंतु विरोधी पक्षाने नागरिकांच्या एखाद्या प्रश्नावर आवाज उठल्यावर त्या प्रश्नावर संवेदनशील होऊन भूमिका सरकारने घेतली पाहिजे होती. पण काँग्रेस व राष्ट्रवादीचे सोडाच मात्र मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्चर्य वाटते की ते या दोन्ही पक्षात जाऊन कसे बिघडू शकतात ? त्यांची संवेदनशीलता कशी इतकी शून्य होऊ शकते ? विजेच्या बाबतीत विरोधी पक्षाने आवाज उठवला, मंदिरे खुली करावी म्हणून आवाज उठवला. सरकारला मंदिरे खुली करण्यास काय अडचण होती ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘सरकारने दारूची दुकाने सुरू केली. दारूच्या दुकानासमोर रांगा लागल्या. लॉकडाऊनमध्ये घरी बसा, दारू प्या आणि बायकांना मारझोड करा, हे या सरकारचे धोरण होते,’ असा गंभीर आरोप फरांदे यांनी केला.
वाचा:
‘गेल्या वर्षभरात मुख्यमंत्र्यांची एकच योजना आली ती म्हणजे ‘तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी’. तुमचे कुटुंब तुम्ही सांभाळा, म्हणजे मी सुटलो, मोकळा झालो. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझे कुंटुंब सांभाळण्यास मोकळा आहे,’ असे सांगत फरांदे यांनी राज्यात सुरु असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेची खिल्ली उडवली. ‘तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री आहात. तुमच्याकडे तिजोरीच्या किल्ल्या असताना तुम्ही राज्यातील जनतेला काय आश्वासन दिले ? काय मदत दिली ? असे प्रश्न फरांदे यांनी उपस्थित केले. एखादा व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर असल्यानंतर त्याने कर्तुत्व दाखवून राज्याचा गाडा सर्वांगीण विकासाकडे घेऊन जाण्याची गरज असते. मात्र त्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अधिक ऐकतात की काँग्रेसचे अधिक ऐकतात, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर पगडा आहे, राष्ट्रवादी त्यांना काम करू देत नाही, या गोष्टी दुय्यम आहेत. पण जेव्हा आपण सरकार म्हणून पाहतो तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री यांची आपत्कालीन काळात जनतेला दिलासा देण्याची महत्त्वाची जबाबदारी असते. पण हा दिलासा जनतेला ना पुर परिस्थितीत, ना चक्रीवादळात, ना अतिवृष्टीच्या काळात ना करोनात मिळाला,’ असेही त्या म्हणाल्या.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times