मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर दाखल झाले आहेत. मंगळवारी रात्री त्यांचे मुंबईत आगमन झाले. त्यांचा मुक्काम ट्रायडेंट हॉटेलमध्ये असून तिथे अभिनेता अक्षयकुमारने त्यांची भेट घेतली आहे. ( meets UP CM Latest News Updates )

वाचा:

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरात यमुना एक्स्प्रेस-वे जवळ चित्रनगरी ( ) उभारण्यात येत आहे. याबाबत योगी यांनी अक्षयकुमारसोबत चर्चा केली. तशी माहिती खुद्द योगी आदित्यनाथ यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. ‘भारतीय सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेते यांच्यासोबत औपचारिक भेट झाली. सिनेविश्वाच्या विविध पैलूंवर त्यांच्यासोबत विस्तृत चर्चा झाली’, असे योगींनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे. सिनेविश्वातील एक कलावंत म्हणून अक्षयकुमार यांची सचोटी, समर्पण आणि सकारात्मकता निश्चितच युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत योगींनी अक्षयकुमारचे कौतुकही या ट्वीटमध्ये केले आहे.

वाचा:

दरम्यान, लखनऊ नगरपालिका बॉण्ड मुंबई शेअर बाजारात एंट्री घेत असून त्याचा लिस्टिंग सोहळा आज सकाळी ९ वाजता मुंबई शेअर बाजार येथे योगींच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता ते डीफेन्स कॉरिडोरच्या गुंतवणूकदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर फिल्मसिटीशी संबंधित गुंतवणूकदार व देशातील आघाडीचे उद्योजक आणि उद्योगसमूहांशीही ते उत्तर प्रदेशातील गुंतवणुकीवर चर्चा करणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषदेत मुंबई दौऱ्याबाबत ते माहिती देणार आहेत. आज संध्याकाळीच योगी आदित्यनाथ पुन्हा लखनऊला परतणार आहेत.

वाचा:

योगींवर महाविकास आघाडीच्या आरोपांच्या फैरी

योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याने आधीच वादळ उठलेले आहे. मुंबईतील उत्तर प्रदेशात नेण्याचा डाव भाजपने रचला आहे, असा आरोप महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करत आहेत. योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यात बॉलिवूडच्या निर्मात्यांना धमकावू शकतात. त्याबाबत सरकारने खबरदारी बाळगावी, अशी भीती काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आधीच व्यक्त केली आहे. गृहराज्यमंत्री यांनीही मंगळवारी योगींवर निशाणा साधला आहे. मुंबईतील सिनेसृष्टी उत्तर प्रदेशात नेण्याचा भाजपचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. सिनेसृष्टी ही महाराष्ट्राची आणि मुंबईची शान आहे. येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सिनेसृष्टी इतर राज्यात जाऊ देणार नाही, असे पाटील यांनी सांगितले. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. सिनेसृष्टीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा मुंबईत आहेत. देशात कुठेही नाहीत एवढ्या सुविधा येथे आहेत. त्यामुळे ती इतरत्र हलविण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री आदित्यनाथ हे कदाचित या सिनेसृष्टीच्या अभ्यासासाठी मुंबईत येत असावेत, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी भाजपवरील आरोप फेटाळले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here