गृहमंत्री अनिल देशमुख व आदित्य ठाकरे यांनी स्वत: या निर्णयाची माहिती दिली. नाइट लाइफमुळं पोलिसांवर कोणताही ताण येणार नाही. तसंच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असं देशमुख यांनी सांगितलं. नाइट लाइफ सुरू झाली तरी पब आणि बारला पूर्वीप्रमाणेच वेळेची मर्यादा राहील. पब आणि बार दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘नाइट लाइफ’ सुरू होणार असली तरी दुकानं उघडी ठेवण्याची सक्ती कुणावरही केली जाणार नाही. ती बाब पूर्णपणे ऐच्छिक असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आठवड्याभरात आस्थापन कोणत्या दिवशी बंद ठेवायचे, याचा निर्णय व्यावसायिकांचा असणार आहे.
वाचा:
आधी जेएनयू, दिल्ली सांभाळा!
‘नाइट लाइफ’मुळं मुंबईत गुन्हेगारी वाढणार असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. ‘नाइट लाइफ हा रोजगाराच्या संधी देण्याचा एक प्रयत्न आहे. या प्रयोगावर टीका करणाऱ्यांनी या संदर्भातील शासन निर्णय वाचला असता तर त्यांनी अशी टीका केली नसती. वाचूनही ते टीका करत असतील तर तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेबाबत बोलणाऱ्यांनी आधी जेएनयू व दिल्ली सांभाळावी. विद्यापीठं सुरळीत चालवावीत, मग मुंबईबद्दल बाता माराव्यात, असंही त्यांनी सुनावलं.
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times