म. टा. प्रतिनिधी, सांगली: फडणवीस सरकारच्या ( ) कालावधीत जलयुक्त शिवार योजनेतून ( ) झालेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. यानुसार सांगली जिल्ह्यातील सुमारे १७ हजार कामांची चौकशी बुधवारपासून सुरू झाली. मागील तीन वर्षात ४२१ गावांत १७७ कोटी रुपयांचा निधी खर्च करून जलयुक्त शिवारची कामे केली आहेत. सर्व कामांची कागदपत्रे घेऊन अधिकार्‍यांना मंत्रालयात बोलवल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जललयुक्त शिवार योजनेतून राज्यात झालेल्या कामांबाबत कॅगने ताशेरे ओढल्यानंतर चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. सांगली जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये आठ तालुक्यातील ४०३ गावांमध्ये राबविण्यात आली. सन २०१५-१६ मध्ये १४१ गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये ४ हजार ७२९ कामे पूर्ण झाली आहेत. २०१७-१८ या वर्षात १४० गावांमध्ये ७ हजार ९५१ कामांपैकी ७ हजार ८३४ कामे पूर्ण झाली आहेत.

यातील अनेक कामांबद्दल स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत. बोगस काम झाल्याचे आरोप केले जातात. जत तालुक्यात झालेल्या कामांच्या फाईल्स घेऊन अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत. गुरुवारी मंत्रालयात वरिष्ठ अधिकां-यांना कामांची माहिती दिली जाणार आहे. जिल्ह्यातील जलयुक्त शिवारच्या सर्वच कामांची चौकशी होणार असल्याने अधिकार्‍यांत खळबळ उडाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here