पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आज तब्बल सव्वा महिन्यानंतर नगरला आले होते. यावेळी त्यांनी विविध विभागाच्या आढावा बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत पालकमंत्री यांच्यासमोरच आमदार जगताप यांनी प्रशासनाचे वाभाडे काढताना अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
वाचा:
‘सुपारी देऊन एखाद्याची हत्या करण्यापर्यंत जर नगर शहरात प्रकार घडत असतील तर हे अतिशय गंभीर आहे,’ असे सांगत जगताप म्हणाले, ‘नगर शहरापासून जवळच असणाऱ्या केडगाव उपनगरात सहा वाजण्याच्या सुमारास दरोड्याचे प्रकार होऊ लागले आहेत. सहा वाजताच स्वतःचे संरक्षण लोकांना करावे लागत असेल, तर ही गंभीर बाब आहे. याबाबतीत अनेक वेळा मी प्रशासनाला सांगितले. पण उपयोग झाला नाही. एवढे छोटे-मोठे प्रश्न आम्ही विधानसभेत मांडायचे का ? असा प्रश्नही जगताप यांनी उपस्थित केला. चार महिन्यापासून मोकाट जनावरांचा प्रश्न आहे. त्याकडे महापालिकेत वेळोवेळी तक्रार करून लक्ष दिले जात नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाचा रस्ता मार्गी लागला जात नाही, हे योग्य नाही,’ असे जगताप म्हणाले. त्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगेच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना आमदार संग्राम जगताप यांचे उपस्थितीत बैठक घेण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे सांगण्यात आले आहे.
वाचा:
दरम्यान, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रशासनाचे वाभाडे काढल्यामुळे या प्रकाराची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू झाली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times