वाचा:
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ” महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही ” ही पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी सरकारच्या वर्षभरातील कामगिरीची स्तुती केली व मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वालाही दाद दिली. ‘राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि सरकार चालवत असताना ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिले ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अबोल असले तरी चतुर आहेत, त्यांनी तीन पक्षांचे सरकार यशस्वीपणे चालवले आहे. हे सरकार पाच वर्षे जनतेसाठी काम करत राहील, हा मला विश्वास आहे’, असे प्रतिपादन शरद पवार यांनी यावेळी केले.
वाचा:
‘हे सरकार म्हणजे जगन्नाथाचा रथ असून त्याला पुढे नेण्याची कामगिरी सर्वांच्या साथीने होत आहे. वर्षभरात संकटग्रस्ताला धीर देण्याचे काम या शासनाने केले आहे. त्यामुळे संकटकाळात बळीराजा कधी रस्त्यावर आला नाही, इतके उत्तम काम या शासनाने केले आहे, असे पवार म्हणाले. या सरकारमध्ये अनेक सहकारी असे आहेत ज्यांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रदीर्घ प्रशासनाचा अनुभव असलेले सहकारीही आहेत. एका बाजुने नवी उमेद तर दुसऱ्या बाजूने प्रदीर्घ अनुभव याचा सुरेख संगम असल्यामुळेच हे सरकार यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मुख्य म्हणजे नवीन उमेद आणि प्रदीर्घ अनुभव या समन्वयातून या शासनाची वाटचाल सुरू असतानाच लोकांचा सहभागही यात दिसून आला ही सर्वात जमेची बाजू असल्याचे पवार म्हणाले. साथीच्या या कठीण काळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समर्थ नेतृत्व केल्यामुळेच पुढे जाता आले. लोकांनीही संकट निवारणात सरकारला साथ दिली, असे सांगत सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ अशाच पद्धतीने पूर्ण करेल, असा विश्वास पवार यांनी बोलून दाखवला. आजच्या सोहळ्यास उपस्थित राहताना विशेष आनंद होत आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times