मुंबई: दिवाळीनंतर करोनाच्या साथीवर नियंत्रण राखण्यात राज्यातील आरोग्य यंत्रणा यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. परिणामी करोनामुक्त रुग्णांचा आकडा वेगाने वाढत असून गुरुवारी दिवसभरात ८ हजार ६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील पुन्हा एकदा वाढू लागला असून गुरुवारी हे प्रमाण ९२.७० टक्के इतके राहिले. ( Latest News Updates )

वाचा:

करोनाची दुसरी लाट आलीच तर त्या लाटेची तीव्रता मोठी असेल. ही लाट म्हणजे त्सुनामीच असेल. तेव्हा वेळीच सावध व्हा आणि शासनाने सांगितलेले नियम काटेकोरपणे पाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्याचवेळी आरोग्य विभागही व्यापक प्रमाणात जनजागृती करत आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून येत असून करोनाच्या वाढत्या आकड्याला वेसण घालण्यात बऱ्यापैकी यश आल्याचे गेल्या काही दिवासांतील आकडेवारीवरून दिसत आहे.

वाचा:

राज्यात गुरुवारी ५ हजार १८२ नवीन रुग्णांचे निदान झाले तर ८ हजार ६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत एकूण १७ लाख ३ हजार २७४ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) आता ९२.७० टक्के इतके झाले आहे. गुरुवारी ११५ बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली तर आतापर्यंत एकूण ४४ हजार ४७२ रुग्ण करोनामुळे दगावले आहेत. राज्यातील मृत्यूदर २.५८ टक्के इतका खाली आला आहे. राज्यात आतापर्यंत १ कोटी १० लाख ५९ हजार ३०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ३७ हजार ३५८ (१६.६१ टक्के) नमुने करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात ६५१ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्यात गुरुवारी ६५१ नवीन रुग्णांची वाढ झाली तर आठ रुग्ण दगावले. आतापर्यंत जिल्ह्यात करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या पाच हजार ७१० वर पोहचली आहे. तर बाधितांचा एकूण आकडाही वाढत दोन लाख ३० हजार ७२२ वर गेला आहे. यापैकी दोन लाख १७ हजार ६५४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या सात हजार ३५८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here