कॅनबेरा: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने ७ बाद १६१ धावा केल्या. भारताकडून केएल राहुलकडून अर्धशतक केले. राहुल वगळता अन्य कोणाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. भारताने सातत्याने विकेट गमवल्या त्यामुळे मोठी धावसंख्या करता आली नाही. रविंद्र जडेजाने अखेरच्या काही षटकात फटकेबाजी केल्यामुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या करता आली.

वाचा-

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरूवात केएल राहुल आणि शिखर धवन यांनी केली. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शिखर पुन्हा एकदा अपयशी ठरला. शिखर सहा चेंडूत फक्त १ धाव करू शकला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. तो ९ धावाकरून माघारी परतला.

विराटच्या जागी आलेल्या संजू सॅमसनला मोठी संधी होती. त्याने राहुल सोबत काही फटकेबाजी केली. पण २३ धावांवर तो बाद झाला. सॅमसनच्या जागी आलेल्या मनिष पांडेने निराश केले. तो दोन धावा करून बाद झाला. दरम्यान केएल राहुलने ३७ चेंडू ५० धावा केल्या. पण धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात राहुल ५१ धावांवर बाद झाला.

राहुल बाद झाल्यानंतर हार्दिक आणि जडेजा तिसऱ्या वनेड सामन्याप्रमाणे मोठी धावसंख्या उभी करून देतील असे वाटले होते. पण फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात हार्दिकने विकेट गमावली. अखेरच्या षटकात वॉशिंग्टन सुंदर बाद झाला. जडेजाने फक्त २३ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ४४ धावा केल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here