वाचा :
वाचा :
LIVE अपडेट :
– खाण्या-पिण्याच्या वस्तू घेऊन समाजवादी पक्षाचे नेते दिल्ली – नोएडाच्या चिल्ला सीमेवर दाखल झाले होते. परंतु, कोणत्याही राजकीय पक्षाची मदत घेणार नसल्याचं नम्रपणे स्पष्ट कर शेतकऱ्यांनी त्यांना माघारी पाठवलं.
– कृषी कायद्यासंबंधी केंद्र सरकारसोबत चर्चेसाठी शेतकरी प्रतिनिधीमंडळ विज्ञान भवनाकडे रवाना झाले
– हे विरोधी नेत्यांचं राजकारण आहे. विरोधकाकांडून शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न होतोय. आजच्या बैठकीत नक्कीच तोडगा निघेल : कृषी राज्य मंत्री कैलाश चौधरी
– या चर्चेच्या अगोदर केंद्रीय गृहमंत्री , संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर तसंच वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हे केंद्रातील बडे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पोहचले आहेत.
– केंद्र सरकारनं तीन्ही काळे कायदे मागे घेत किमान हमीभाव देण्यावर लिखित आश्वासन द्यावं. आजच्या चर्चेत काही तोडगा निघाला नाही तर राजस्थानातूनही शेतकरी राष्ट्रीय महामार्ग ८ वरून दिल्लीकडे कूच करतीय : रामपाल जाट, अध्यक्ष, किसान महापंचायत
– आज दुपारी २.०० वाजता शेतकऱ्यांसोबत बैठक होणार आहे. शेतकरी सकारात्मक पद्धतीनं विचार करत आपलं आंदोलन मागे घेतील अशी मला आशा आहे : कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर
वाचा :
वाचा :
– आज होणाऱ्या पाचव्या चर्चेत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतील, अशी आशा भारतीय किसान युनियन नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केलीय.
– आज शेतकऱ्यांकडून केंद्र सरकार आणि सरकारच्या कॉर्पोरेट धोरणांचा निषेध केला जाणार आहे.
– शेतकरी संघटनांकडून येत्या मंगळवारी म्हणजेच ८ डिसेंबर रोजी भारत बंदचं आवाहन करण्यात आलंय.
– याअगोदर ३ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्ययांवर विचार करण्याचं आश्वासन दिलं होतं.
वाचा : वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times