राज्यात दिवाळीनंतर करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर आज करोना रुग्णांची संख्या उतरणीला आल्याचं चित्र आहे. मागील काही दिवसांपासून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण करोना बाधित रुग्णांपेक्षा अधिक दिसू लागले आहे. अधूनमधून लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यात फारशी गती नाही. करोना रुग्ण सापडण्याची मालिका खंडित झालेली नसली तरी रुग्ण सापडण्याचे प्रमाण निश्चितच कमी दिसून येत आहे. आजही ५ हजार ८३४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
राज्यात आज ५ हजार ८३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत त्यामुळं राज्यात आजपर्यंत एकूण १७ लाख १५ हजार ८८४ रुग्णांनी करोनाची लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे. राज्यात इतक्या मोठ्या संख्येनं करोना रुग्ण बरे झाल्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट ९२. ८८ टक्के इतका झाला आहे. तर, राज्यातील रुग्णसंख्या १८, ४७, ५०९ इतकी झाली आहे.
राज्यात सध्या ९५ हजार करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील करोना मृतांची संख्या ४७ हजार ६९४ इतकी झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८% इतका आहे.
आज पर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १२ लाख ०५ हजार ११८ प्रयोगशाळा चाचण्यांपैकी १८ लाख ४७ हजार ५०९ चाचण्या पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६० हजार ६८५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये तर ५ हजार ८५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times