वाचा:
राज्यातील आरोग्य यंत्रणांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे करोनावर गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण मिळवता आले आहे. करोनामुक्त रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच रिकव्हरी रेटही नव्या पातळीवर पोहचला आहे. रिकव्हरी रेट ९२ टक्क्यांवर गेल्यानंतर गेले अनेक दिवस त्यात विशेष फरक दिसत नव्हता. मात्र, आज रिकव्हरी रेट (Recovery Rate) ९३.०४ टक्क्यांवर पोहचला असून अनेक अर्थांनी ही खूपच दिलासादायक बाब ठरली आहे. मुख्य म्हणजे मृत्यूंचे प्रमाण कमी होऊन आज हा आकडा ४० पर्यंत खाली आल्याने तेही चांगले संकेत मानले जात आहेत. राज्याचा सध्या २.५८ टक्के इतका आहे.
वाचा:
आज राज्यात ४ हजार ७५७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ७ हजार ४८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १७ लाख २३ हजार ३७० करोना बाधित रुग्णांनी या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.०४ % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १२ लाख ७३ हजार ७०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ५२ हजार २६६ (१६.४३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५६ हजार ८५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ५ हजार ९०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आला ८० हजारांवर
राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या (अॅक्टिव्ह रुग्ण) करोना बाधितांचा आकडा ८० हजार ७९ पर्यंत खाली आला आहे. त्यात जिल्ह्यात सर्वाधिक १५ हजार ४२३, जिल्ह्यात १४ हजार ४४१ तर पालिका हद्दीत १४ हजार ५१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. करोनासाठी हे तीन प्रमुख हॉटस्पॉट ठरले असून तिन्ही ठिकाणी नवीन रुग्णसंख्येत सातत्याने घट पाहायला मिळत आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times