मुंबईः दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणही तापलं आहे. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला महाविकास आघाडीनं पाठिंबा दिला आहे. संजय राऊत यांनीही शिवसेनेची भूमिका जाहीर केली आहे. दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन पुकारलं आहे. गेल्या १० दिवसांपासून शेतकरी दिल्लीच ठाण मांडून बसले आहेत. त्यातच ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यातच मनसेनंही शेतकऱ्यांना समर्थन दिलं आहे तसंच, काही सवालही उपस्थित केले आहेत.
वाचाः
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच शेतकऱ्यांबरोबर होती आहे आणि राहणार, पण आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.
वाचाः
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times