नवी दिल्ली: नवीन कृषी कायद्यांविरोधात ( ) शेतकर्‍यांचं आंदोलन ( ) सुरू आहे. या आंदोलनाचा उल्लेख टाळत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( ) सोमवारी टिप्पणी केल्याचं सांगण्यात येतंय. मागील शतकातली कायद्यांनी नव्या युगाचा निर्मिती करता येऊ शकत नाही. कारण गेल्या शतकात उपयोगी ठरणारे कायदे पुढील शतकासाठी ‘ओझे’ ठरू शकतात. म्हणूनच सुधारणेची प्रक्रिया सतत चालवली पाहिजे, असं म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आग्रा मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या बांधकामाचा उल्लेख केला. यानंतर पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख न करता अप्रत्यक्षपणे त्यावर टिप्पणी केल्याचं म्हटलं जातंय. “नवीन सुविधा आणि यंत्रणांमध्ये सुधारणा करणं फार महत्वाचे आहे. मागील शतकाचे कायदे घेऊन आपण नवीन शतकाचे निर्माण करू शकत नाही. गेल्या शतकामध्ये जे कायदे अतिशय उपयुक्त ठरले ते पुढील शतकासाठी ओझं बनतात आणि म्हणूनच सतत सुधारणेची प्रक्रिया चालू ठेवली पाहिजे, असं मोदी म्हणाले.

आता होणाऱ्या सुधारणा या पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कशा काय काम करतात? असा प्रश्न अनेक जण उपस्थित करतात. पण याचं उत्तर अगदी सोपं आहे. यापूर्वीच्या सुधारणा या तुकड्यांमध्ये होत होत्या. काही क्षेत्र आणि काही विभाग डोळ्यासमोर ठेवून केल्या जात असत. पण आता समग्र दृष्टिकोनातून सुधारणा करण्यात येत आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. आपले सरकार ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ या मूलभूत मंत्रावर भर देऊन काम करत आहे आणि प्रत्येक निवडणुकीच्या निकालातूनही जनतेचा हा विश्वास दिसून येतो, असं मोदी म्हणाले.

रस्त्यावरील फेरीवाले, हातगाडीवाले आणि गरीब व मध्यम वर्गाच्या कल्याणापर्यंतच्या योजना मैदानावर सुरू केल्या आहेत. हा ‘सबका साथ, सबका विकास, सर्वांचा विश्वास’ आहे. गेल्या काही काळात केलेल्या सुधारणांमुळे देशात नवीन विश्वास निर्माण झाला आहे. आपण तपशीलांमध्ये गेल्यास आपण समाधानी असाल. आधीच्या तुलनेत तुम्हाला आपल्यामध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण होईल. हा विश्वास गेल्या प्रत्येक निवडणुकीतून दिसून येतो, असं मोदींनी सांगितलं.

यूपीसह देशाच्या कानाकोपऱ्यात निवडणुकीच्या निकालातून हा विश्वास दिसून येतो. दोन-तीन दिवसांपूर्वी हैदराबादमधील गरीब आणि मध्यमवर्गाने सरकारच्या प्रयत्नांना अभूतपूर्व आशीर्वाद दिले आहेत. अशा समर्थनाने देशवासियांच्या छोट्या छोट्या आनंदासाठी काम करण्याची हिंमत आपल्याला मिळते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here