जिल्ह्यामध्ये १४०८ ग्रामपंचायती असून, आठ ग्रामपंचायती या नव्याने स्थापन झाल्या आहेत. नवीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबत राज्य सरकारकडून सूचना आलेल्या नसल्याने १४०० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत ही मंगळवारी होणार आहे. तहसीलदार कार्यालयांकडून या सोडतींचे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या ग्रामपंचायतींपैकी खुल्या गटासाठी ७५६ ग्रामपंचायतींचे सरपंच पद असणार असून, त्यामध्ये ३८३ महिलांना संधी मिळणार आहे. इतर मागास प्रवर्गासाठी ३४७ जागा या आरक्षित आहेत. त्यामध्ये १७७ महिला असणार आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंचपदाच्या २३९ जागांपैकी १२४ महिला सरपंचांची निवड होणार आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या ५८ जागांपैकी ३० जागा या महिलांसाठी राखीव असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times