वाचा:
शरद पवार यांनी तीन दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत महत्त्वाचे आणि तितकेच वादाला तोंड फोडणारे विधान केले होते. देश सध्या राहुल गांधी यांचं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे का?, अशी विचारणा केली असता या प्रश्नाचे थेट उत्तर न देता, राहुल यांच्या नेतृत्वात सातत्याचा अभाव असल्याचे पवार यांनी सांगितले होते. पवारांच्या या विधानावरून महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली. आघाडीचं सरकार नुकतंच कुठे एक वर्ष पूर्ण करत असताना आघाडीच्या शिल्पकारानेच असे विधान केल्याने काँग्रेस पक्षातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
वाचा:
शरद पवार यांच्या विधानावर सर्वप्रथम महिला व बालविकास मंत्री यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचे नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे, असे नमूद करतानाच महाविकास आघाडी सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल तर काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळावे आणि आघाडी धर्माचे पालन सर्वांनी करावे, असा सल्लावजा इशारा यशोमती ठाकूर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिला होता. ‘आघाडीमधील काही नेत्यांच्या मुलाखती/लेख’ असा उल्लेख करताना ठाकूर यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख मात्र टाळला होता. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तर अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
वाचा:
‘शरद पवार यांच्या ज्येष्ठत्वाचा आम्ही मान राखतो मात्र, राहुल गांधी यांना समजून घेण्यात ते कमी पडले असे मला वाटते’, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी पवारांवर निशाणा साधला. राहुल गांधी हे आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष संघटन पातळीवर पुन्हा एकदा मजबूत होत आहे. राहुल यांना जीवनात अनेक दु:ख आणि आघात झेलावे लागले आहेत. त्यानंतरही न डगमगता ते समर्थपणे नेतृत्व करत आहेत आणि यापुढेही ते पक्षाला नेतृत्व देतील, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. यशोमती ठाकूर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून जी भावना व्यक्त केली, त्याचेही थोरात यांनी समर्थन केले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times