भारतात कोणत्याही सुधारणा लागू करणे खूपच अवघड आहे कारण, भारतात लोकशाही व्यवस्थेचं अधिक कौतुक होतंय. अशा सुधारणांसाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. ती पूर्ण करण्याची इच्छाशक्ती या सरकारने दाखवली आहे. केंद्र सरकारने पहिल्यांदात खाणकाम, कोळसा, मनुष्यबळ आणि कृषी क्षेत्रातील सुधारणांना हात घातला आहे.परंतु त्या राबवणे कठीण जात आहे, असं अमिताभ कांत यांनी म्हटलं होतं. अमिताभ कांत यांच्या या वक्तव्यानंतरच सुप्रिया सुळेंनी एक ट्विट केलं आहे.
सुप्रिया सुळेंनी ट्विट करत कांत यांच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे. ‘ भारतात लोकशाहीचे कौतुक जास्त होतंय, हे वरीष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे विधान धक्कादायक आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेत हे अतिशय बेजबाबदार विधान आहे. त्याचा तीव्र निषेध. भारतातील लोकशाही व्यवस्थेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times