शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश नाकारला गेल्यानंतर शेतकरी गेल्या दोन आठवड्यांपासून सिंघू बॉर्डरवर धरणे धरून बसले आहेत.
लवकरच तारखेची घोषणा करणार- बूटासिंह, शेतकरी नेते
पंजाबमध्ये टोल प्लाझा, मॉल, रिलायन्सचे पंप, भाजप नेत्यांची कार्यालयांना घेराव घालण्यात येईल असे शेतकरी नेते बूटासिंह यांनी सांगितले. या व्यतिरिक्त १४ तारखेला पंजाबच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर धरणे दिले जाणार आहे, असे बूटासिंह म्हणाले. जर यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही सर्व रेल्वेमार्ग बंद करू आणि यासाठी आम्ही पंतप्रधानांना १० तारखेची मुदत दिली होती, असेही बूटासिंह म्हणाले. इतकेच नाही तर रेल्वेमार्गांवर संपूर्ण भारतातील लोक जातील असेही ते पुढे म्हणाले. संयुक्त शेतकरी मंच या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
व्यापाऱ्यांसाठी तयार केले गेले कायदे- बलबीर सिंह
हे कायदे व्यापाऱ्यांसाठी तयार करण्यात आल्याचे केंद्र सरकारने स्वीकारले असल्याचे एका शेतकरी संघटनेचे नेते बलबीरसिंह राजेवाल यांनी सांगितले. जर कृषी हा राज्याचा विषय असेल, तर मग केंद्र सरकारला दिल्लीत कायदे बनवण्याचा अधिकार नसल्याचेही ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times