वाचा:
उंबरखांड गावात राहणारी (३०) आणि तिची तीन मुले दर्शना (१२), रोहित (९ वर्ष), रोहिणी (६ वर्ष) असे चौघेही २० ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. शेतावर चवळी तोडण्यासाठी जातो म्हणून हे सर्वजण घरातून निघून गेले. मात्र परत घरी परतले नाहीत. स्थानिक गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र सापडले नाहीत. या प्रकरणी भिवंडीतील ठाण्यात चौघे बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. गुरुवारी दुपारी या महिलेचा दीर आणि त्याची पत्नी लाकडे गोळा करण्यासाठी उंबरखांडच्या जंगलात गेले होते. त्यावेळी जंगलात कसला तरी उग्र वास येत होता. त्यांनी आसपास पाहिले असता येथील गण्याच्या डोंगरावरील आपट्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोन मृतदेह तर अन्य दोन मृतदेह खाली पडलेले दिसून आले. हे मृतदेह सडून सांगाडे राहिले होते. मागील दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या रंजना आणि तिच्या तीन मुलांचे हे मृतदेह होते. याबाबतची माहिती कळताच रंजनाचा पती आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तात्काळ उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ठामे ग्रामीण पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
वाचा:
चौघांच्याही मृत्यूने खळबळ उडाली असून ठाणे ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडलेल्या चारही मृतदेहांबाबत तपास सुरू असून मृत महिलेचा पती आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीची प्रकृती आता स्थिर आहे. रंजना हिच्या पतीने दुसरे लग्न केले आहे. यावरून त्यांच्यात कुरबुर चालू होती, असे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.
पती आणि सवतीविरुद्ध गुन्हा दाखल
या आत्महत्या प्रकरणात कौटुंबिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये समोर आले आहे. त्यामुळे महिलेचा पती श्रीपत आणि सवत सविता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times