वाचा:
नाशिक येथे ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबई महापालिका ताब्यात घेऊन शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे. हैदराबाद महापालिकेत मुसंडी मारल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. शिवसेनेविरोधात रणनीतीचीही चर्चा सुरू आहे. मनसेला सोबत घेता येऊ शकतं का याचीही चाचपणी सुरू आहे. मनसे सोबत आल्यास शिवसेनेची मराठी मते मोठ्या प्रमाणावर खेचता येतील असाही भाजपचा होरा आहे.
वाचा:
या साऱ्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी संजय राऊत यांना मनसे-भाजप युतीबाबत प्रश्न विचारला. त्यावर शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही, असं ते म्हणाले. ‘मुंबई महापालिकेत शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. पुढच्या निवडणुकीत कोणीही कोणाबरोबरही गेले तरी सत्ता शिवसेनेचीच राहणार. हैदराबादमध्ये भाजपला ओवेसी मिळाले होते. मुंबईत कोण सापडतंय बघू,’ असा टोला त्यांनी हाणला.
वाचा:
‘राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रच लढेल. एकत्र निवडणूक लढल्याचा नागपूर व पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीत फायदा झाला आहे. नाशिकमध्ये देखील एकत्र लढणार. स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची भूमिका वेगळी असली तरी प्रमुख नेत्यांचा निर्णय झाला आहे,’ असंही ते म्हणाले.
शिवसेना यूपीएचा भाग नाही!
यूपीएच्या अध्यक्षपदासाठी सध्या शरद पवारांच्या नावाची चर्चा आहे. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ‘यूपीएचं नेतृत्व कोणी करावं याविषयी केवळ चर्चा सुरू आहे. निर्णय झालेला नाही. शिवसेना यूपीएचा भाग नाही. मात्र, महाराष्ट्राचा नेता यूपीएचा अध्यक्ष झाला तर आम्ही स्वागत करू,’ असं ते म्हणाले.
आणखी काय म्हणाले संजय राऊत?
> शिवसेनेची भीती कायम आहे आणि राहील. ED व CBI ने भाजप कार्यकर्त्यासारखं वागू नये. माझ्याकडे भाजपच्या १२० लोकांची यादी आहे. ती लवकरच मी ईडीला पाठवणार आहे.
> राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडीचा वापर होत आहे. प्रताप सरनाईक उत्तर द्यायला समर्थ आहेत.
> दिल्ली शेतकरी आंदोलकात फूट पडू शकली नाही. सरकारनं माघार घ्यावी. अन्यथा, देशातील वातावरण पेटेल. लोकसभेत कायदा पुन्हा चर्चेला आणावा, शेतकऱ्यांना हवा तसा करावा.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times