भोपाळ: भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी (Pragya Singh Thakur) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. साध्वी प्रज्ञा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री (Mamata Banerjee) यांच्यासंदर्भात एक केले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी वेड्या झाल्या आहेत. त्यांचा तिळपापड झाला आहे. हा भारत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे, ज्यावर त्या शासन करत आहोत तो हा पाकिस्तान नाही. बंगालमध्ये भाजपचे शासन येईल, हिंदूंचे राज्य येईल, असे साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे. ( makes on )

एक मत देऊन कोणी कोणाला विकत घेत नाही, मत खरेदी देखील केले जाते. काँग्रेस हेच करतो, असे व्यवसायिकांना संबोधित करताना साध्वी प्रज्ञा यांनी नुकतेच म्हटले होते. भारतीय जनता पक्षाच्या खासदार असेलल्या साध्वी प्रज्ञा यांनी भोपाळमधील न्यू मार्केट परिसरात झालेल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात हे वक्तव्य केले. या कार्यक्रमात त्यांनी व्यापाऱ्यांना ऐकवले. त्या म्हणाल्या, तुम्ही लोक आम्हाला मते देऊन खरेदी करत नाही आहात. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर या आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. त्यांनी लोकसभेत एसपीजी दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त असे म्हटले होते. याच वर्षी जुलै महिन्यात त्यांना फोनवर धमकी देखील मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

क्लिक करा आणि वाचा-

सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव केला होता.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here