‘शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताच्या एकता आणि अखंडतेला आव्हान दिले जात आहे’
रविशंकर प्रसाद यांच्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री () यांनी देखील असेच वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताच्या एकता आणि अखंडतेला आव्हान दिले जात आहे, असे योगी आदित्यनाथ यांनीही म्हटले आहे. शेतकरी बांधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देशाची सुरक्षा कमकुवत केली जात आहे आणि हे स्वीकारण्याजोगे नाही, असे आदित्यनाथ म्हणाले.
केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्ली बोर्डरवर गेल्या १८ दिवसांपासून हजारोंच्या संख्येने करत आहेत. मात्र सरकार आणि शेतकऱ्यांची बोलणी यशस्वी होताना दिसत नाही. तसे पाहिले तर शेतकरी आणि सरकारमध्ये बैठका तर झाल्या आहेत. मात्र कोणताही निष्कर्ष निघू शकलेला नाही. सरकारला हे आंदोलन लवकरात लवकर समाप्त करायचे आहे. सरकारच्या बचावासाठी मोदी सरकारचे अनेक नेते मैदानात उतरले आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर मोठा हल्ला केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे, ‘आपले पीक भारतात कुठेही विकण्याची शेतकऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. कोणीही त्यांना रोखणार नाही. तुमच्या पिकावर वेगळा बाजाराचा कर लागणार नाही. या वर्षी भारत सरकारने एमएसपीअंतर्गत ६० हजार कोटींची धानखरेदी केली आहे. यात ६० टक्के धान हे एकट्या पंजाबमधून खरेदी करण्यात आले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times