मुंबई: करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीवरून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांची केंद्राच्या या निर्णयामुळं पुरती गोची झाल्याचं चित्र आहे.

वाचा:

राज्य विधिमंडळाचं दोन दिवसांचं अधिवेशन सध्या सुरू आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी कमी करून दोन दिवसांचा करण्यात आला. त्यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजपनं सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्य सरकार प्रश्नांपासून पळ काढतंय, असा आरोप विरोधी पक्षनेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, वाढीव वीज बिल, शक्ती कायदा व पुरवणी मागण्यांवर चर्चा करायला सरकार तयार नाही, अशी टीका विरोधकांनी केली आहे. सरकार हे आठवे आश्चर्यच आहे, असा टोलाही भाजप नेत्यांनी हाणला होता.

वाचा:

झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांनी भाजपला घेरलं आहे. ‘राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी आहे अशी बोंब ठोकत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हणणारा भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष आहे. मोदी सरकारनं कोविडमुळं संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्दच केलं. आता मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार?,’ असा बोचरा सवाल सावंत यांनी केला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here