मुंबईः केंद्र सरकारने संसदेचं रद्द केल्यानंतर मोदी सरकारवर विरोधकांनी टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना नेत्या यांनीही याच मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी आधिवेशन रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. शिवसेना नेत्या व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही एक ट्विट केलं आहे. उर्मिला मातोंडकर यांचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

‘राज्यात निवडणुका घेण्यात आल्या, त्यासाठी मोठ्या सभांचेही आयोजन करण्यात आलं. सर्व पक्षांच्या चर्चेशिवाय जिथे कायदे लादले जातात ती संसद वगळता संपूर्ण देश पुन्हा पुर्ववत झालाय. खरोखरच खूप लोकशाही आहे,’ असं ट्विट उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे. matondkar

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here