नवी दिल्लीः कॉंग्रेस नेते ( ) यांच्यासह अनेक नेत्यांनी संत बाबा राम सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बाबा राम सिंह ( sant baba ram singh ji ) यांना श्रद्धांजली वाहत राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बलिदान दिलं आहे. मोदी सरकारने मात्र क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींनी यासंदर्भात ट्विट केलं. कर्नालच्या संत बाबा राम सिंह यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. कुंडली सीमेवरील शेतकर्‍यांची दुर्दशा पाहून व्यथीत झालेल्या बाबा राम सिंह यांनी आत्महत्या केली. या दुःखाच्या क्षणी आपल्या संवेदना आणि श्रद्धांजली. अनेक शेतकऱ्यांनी आपलं बलिदान दिलं आहे. मोदी सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सकारने जिद्द सोडावी आणि कृषी कायदे त्वरित मागे घ्यावे, असं राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणाले.

कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही शोक व्यक्त केला आहे. हे राम, ही काय वेळ आली आहे? हे कोणतं युग आहे, जिथे संत देखील व्यथित आहेत. संत राम सिंह यांनी शेतकर्‍यांचे दु: ख पाहून आपल्या जीवाचं बलिदान दिलं. ही अतिशय धक्कादायक घटना आहे. त्यांचा मृत्यू हा मोदी सरकारच्या क्रौर्याचा परिणाम आहे, अशी टीका रणदीप सुरजेवाला यांनी केली.

संत बाबा राम सिंह यांना शेतकर्‍यांच्या वेदना सहन झाल्या नाहीत. त्यांनी स्वत: वर गोळी झाडून घेतली. त्यांचा त्याग व्यर्थ जाणार नाही. भारत सरकारला विनंती करतो. परिस्थिती आणखी बिघडू देऊ नये. तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी केली.

संत बाबा राम सिंह यांच्या आत्महत्येचं वृत्त अतिशय वेदनादायक आहे. या दु: खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो. आपले शेतकरी आपला हक्कच मागत आहेत. सरकारने शेतकऱ्यांचा आवाज ऐकावा आणि तिन्ही काळे कायदे मागे घ्यावेत, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.

शेतकर्‍यांच्या वेदना सहन झाल्या नाही

दिल्ली-हरयाणाती सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलनादरम्यान संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. बाबा राम सिंह हे करनालचे रहिवासी होते. त्यांची सुसाइड नोटही समोर आली आहे. आपण शेतकर्‍यांचे होत असलेले हाल पाहिले. ते आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. हे खूप वाईट वाटतंय. सरकार न्याय देत नाहीए. हा अत्याचार आहे. अत्याचार करणं हे पाप आहे, तो सहन करणं देखील एक पाप आहे, असं त्यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटलंय.

संत बाबा राम सिंह कोण होते?

बाबा रामसिंह (वय ६५) हे हरयाणामधील करनालचे रहिवासी होते. हरयाणा आणि पंजाब व्यतिरिक्त जगभरात त्यांचे लाखो अनुयायी आहेत. अनेक शीख संघटनांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केलं होतं.

संत बाबा राम सिंह हे एक शेतकरी तसेच धार्मिक उपदेशक होते. गेल्या काही दिवसांपासून ते दिल्लीत होते आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी होते. त्यांनी शिबिराची व्यवस्था केली होती आणि ब्लँकेट्सही वाटले होते. संत बाबा राम सिंहांचा तळ कर्नाल जिल्ह्यातील सिंगडा गावात आहे. सिंगडाचे बाबाजी यांना नावाने लोकप्रिय होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here